काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सध्या सगळे विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जप करत आहेत. आणि ज्याचा जास्त जप होतो, तो प्रसन्न होतो, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांसाठी आशीर्वाद देण्यासाठी विजयाच्या रूपाने येतील असे, देखील आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा - विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा
advertisement
उद्धव ठाकरेंना सदाभाऊ खोत यांचा टोला
दरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतला आहे. हा निर्णय रास्त असल्याचे देखील सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी एक तर आपण राहू नाहीतर तर देवेंद्र फडणवीस राहतील, या ठाकरेंच्या विधानाचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राहावं, पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राहावे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.