संजय गायकवाड यांनी बहुभाषेचे महत्त्व सांगत छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ताराराणी, येसूबाई आणि माँसाहेब जिजाऊ यांना अनेक भाषा येत होत्या. त्यामुळे ते लोक मूर्ख होते का? असे म्हणत महापुरुषांचा अपमान केला होता. त्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गायकवाड यांना झोडपून काढले. अखेर प्रकरण अंगाशी आले आहे, हे लक्षात येताच संजय गायकवाड यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे.
advertisement
माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, गायकवाडांचा यूटर्न
माझ्या विधानाचा गैर अर्थ काढला गेला आहे. ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे संजय गायकवाड म्हणाले. मी माझे विधान मागे घेतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, अशी कोलांटउडी संजय गायकवाड यांनी मारली.
छत्रपती संभाजीराजे यांनी १६ भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का? कसला ठाकरे ब्रँड आणि त्यांचा करिश्मा?
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे बंधूंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी १६ भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का? असा प्रश्न संजय गायकवाड यांनी विचारला. राज्यात फक्त हिंदीचा विषय नाही. जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा अवगत झाल्या पाहिजेत. हिंदीला विरोध करण्याचे कारण काय असे विचारीत जर ठाकरे ब्रँडचा करिश्मा असता तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार निवडून यायला हवे होते. ते का आले नाहीत? असेही संजय गायकवाड म्हणाले.