नांदप या गावात मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं. मुलगी लिहायला- वाचायला शिकली की तिचं शिक्षण पूर्ण झालं, अशी परिस्थिती या गावात होती. साधारण 20 वर्षांपूर्वी सारिका लग्न करून नांदपमध्ये आल्या. सारिका यांची आई शिक्षिका असल्याने त्यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण होते. सारिका यांना नांदपमधील परिस्थिती एकदम उलटी वाटली. गावातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली.
advertisement
सारिकां यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी अनेक पालकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या मुलींना उच्चशिक्षित करून गावासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला. त्यामुळे आसपासच्या गावातील मुलीच नाही तर मुलं देखील त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी येतात. त्यांनी गावातील अनेक महिलांना देखील मार्गदर्शन करून स्वावलंबी होण्यास मदत केली आहे.
गावाकडच्या महिलेने रांधा-वाढा-उष्टी काढा यामध्ये अडकून राहू नये, असं सारिकांना यांना वाटतं. प्रत्येक स्त्रीने शिक्षण करून स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. महिला कमावती असेल तर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपोआपो बदलतो, असं सारिका शेलार यांचं म्हणणं आहे.