याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचा पदपथ खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसान झालेल्या भागाची दुरुस्ती हाती घेतली. त्यामुळे पर्यटन हंगाम असूनही पर्यटकांसाठी किल्ल्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची निराशा होत आहे.
Mumbai Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचं काम वेगाने सुरू आहे. कोसळलेल्या पदपथाखाली पुन्हा मुरुम भरून त्यावर सोलिंग, पीसीसी, आणि आरसीसी ग्रेड स्नॅपची कामं पूर्ण झाली आहेत. आजूबाजूच्या जांभ्या दगडांच्या पुनर्बांधणी आणि चबुतऱ्यावरील ग्रेनाईटची देखील दुरुस्ती झाली आहे. ड्रेनेज आणि इतर आवश्यक दुरुस्त्या सध्या अंतिम टप्यात आहेत.
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दुरुस्ती झाल्यावर किल्ल्याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल. तज्ज्ञांकडून आवश्यक ती प्रमाणपत्रं मिळाल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलं जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला होईल. पर्यटकांना किल्ल्यात कधीपासून प्रवेश मिळणार याबाबतची अधिकृत माहिती योग्य वेळी सार्वजनिक बांदकाम विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली जाईल, असंही इंगवले यांनी स्पष्ट केलं.