अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी चर्चा ही सुरू झाली आहे. रोहित पवारांनी तर हा अपघात नाही तर घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन ही देण्यात आले आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांच्या मनात कोणकोणत्या शंका?
अखेरच्या क्षणी विमानाचे कर्मचारी बदलले
एटीसीनं दिलेल्या सूचना आणि लँडिंगचा क्लिअरन्स यात विसंगती
विमानातील अत्यंत महत्त्वाच्या वॉर्निंग सिस्टीमबाबत साशंकता
लँडिंगवेळी संकटात असल्याचं कुठलंही संभाषण रेकॉर्डिंग नाही
विमान, देखभाल दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचं फिटनेस
ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.
ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात असे सांगतानाच या प्रकरणाचा सखोलतेने तपास व्हावा. जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
