मनसे पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांना सर्वांत पहिला फोन नितेश राणे यांचा आला होता. याबाबत ते पत्रकार परिषदेत म्हणाले बडतर्फ झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिला फोन नितेश राणे यांचा आला.त्यावेळी अनेकांनी मला धीर दिल्याचेही त्यांनी सांगितले. पण पत्रकार परिषदेपर्यंत तरी त्यांना कोणत्याही मनसे नेत्याने संपर्क केल्याचे दिसत आहे. कारण तिथपर्यंत त्यांना कोणत्याच मनसे नेत्याचा फोन आला नव्हता.
advertisement
या कारणासाठी नितेश राणेंना भेटलो
भाजपच्या काही लोकांना भेटलो म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर ही कारवाई झाल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले. तसेच मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्यावर तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो, असे स्पष्टीकरण खेडेकर यांनी यावेळी दिले.तसेच विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. आणि त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाल्याचेही खेडेकर सांगतात.
मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकरांचं ठरलं, पुढची भूमिकाच सांगून टाकली
माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला,पण मला अद्याप भेट घेता आली नाही आहे. पण संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले.पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव आहे, असे खेडेकर म्हणाले.
पक्षासाठीची धडपड तोकडी पडली
हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. पण पक्षाची शिस्त बिघडेल असे मी कधीच काम केले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली, असे म्हणताना वैभव खेडेकर भाऊक झाले. आणि राज साहेब तुम्ही कालही मनात होता आजही आहात आणि उद्याही राहाल असे म्हणताना वैभव खेडकर भावूक झाले.
हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांची पहिल्यांदाच मनसेवर टीका, राज ठाकरेंचं नाव घेऊन काय बोलले?
तीस वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो.आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला.आजच पत्र पाहून धक्का बसला.असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही.पुढील निर्णय घ्यावा लागेल.अजून निर्णय घेतलेला नाही, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.
चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या धोरणावरही टीका केली. तसेच राज ठाकरेंचा आमच्याकडे फोन नंबर नाही.केवळ मेसेज करू शकतो असा नंबर आमच्याकडे आहे, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.
'BJP च्या लोकांना भेटलो,पण पक्षप्रवेश...', मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर स्पष्टच बोलले
पुढचा निर्णय काय?
फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन.माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याचीही वेळ आहे.झालेली घटना नाकारता येत नाही.हे स्वीकारून मी पुढे जाईल.मला अजिबात घाई नाही.मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईन, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत. तसेच लवकरच मेळावा घेणार, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.