TRENDING:

तुमच्या गावातील रोड खराब आहेत का? मग या ठिकाणी तक्रार करून मिळवा पक्के रस्ते

Last Updated:

Gram Panchayat Road : गावात किंवा ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी बिकट असते. पावसाळ्यात खड्डे, चिखल, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांचा धोका निर्माण होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गावात किंवा ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी बिकट असते. पावसाळ्यात खड्डे, चिखल, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांचा धोका निर्माण होतो. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की, तक्रार कुठे आणि कोणाकडे करायची? ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांबाबत तक्रार करण्याचे विविध मार्ग शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. रस्ता कोणत्या योजनेतून झाला आहे, त्यावरून तक्रार संबंधित विभागाकडे करावी लागते.
Gram panchayat
Gram panchayat
advertisement

ग्रामपंचायत

जर रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असेल, तर तक्रार थेट ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात देता येते. ग्रामपंचायत सभेतही ही तक्रार मांडून ठराव घेता येतो. सभेतील ठरावाच्या आधारे पंचायत पुढील पातळीवर प्रस्ताव पाठवू शकते.

पंचायत समिती

गाव जोड रस्ते किंवा मोठ्या अंतर्गत रस्त्यांबाबतची तक्रार संबंधित गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे करावी. अशा रस्त्यांची कामे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर केल्यास तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते.

advertisement

जिल्हा परिषद

जर रस्ता "प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)" किंवा "जिल्हा परिषद निधी" मधून झाला असेल, तर तक्रार जिल्हा परिषद अभियंता किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे द्यावी. जिल्हा परिषद अशा कामांचे नियोजन, देखरेख आणि निधीचे वाटप पाहते.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा

आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता यावी म्हणून शासनाने ऑनलाइन सुविधा दिली आहे. MahaGov Portal किंवा Aaple Sarkar Portal वर जाऊन रस्त्याबाबत ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रारीसोबत फोटो किंवा व्हिडिओ जोडल्यास तपासणीस वेग येतो आणि तक्रारीला अधिक गांभीर्याने घेतले जाते.

advertisement

RTI (माहितीचा अधिकार) अंतर्गत माहिती मिळवा

जर रस्त्याचे काम झाले नाही, निधी मंजूर झाला का, की नाही याची माहिती हवी असेल, तर नागरिक https://rtionline.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावरून ऑनलाइन RTI अर्ज दाखल करू शकतात. संबंधित विभागाला ३० दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक असते. त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होते.

रस्त्याच्या प्रकारानुसार जबाबदार संस्था

advertisement

गावातील गल्ली / अंतर्गत रस्ते – ग्रामपंचायत

गाव जोड रस्ते (GP ते दुसरे गाव) – पंचायत समिती / जिल्हा परिषद अभियंता

मुख्य जिल्हा रस्ते किंवा राज्य महामार्ग – सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) – जिल्हा परिषद व संबंधित अभियंता

तक्रार लिहिताना काय नमूद करावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

जसे की, रस्त्याचे नाव, गाव, वार्ड क्रमांक, समस्याखड्डे, चिखल, पावसात वाहतूक बंद, अपघाताचा धोका इत्यादी. तसेच शाळा, रुग्णालय, शेताचा रस्ता बंद होणे. फोटो किंवा व्हिडिओ पुरावे जोडल्यास तक्रारीचे वजन वाढते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुमच्या गावातील रोड खराब आहेत का? मग या ठिकाणी तक्रार करून मिळवा पक्के रस्ते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल