TRENDING:

खरंच 25,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार का? HDFC बँकेने स्पष्टच सांगितलं काय खरं काय खोटं

Last Updated:

ICICI बँकेने मिनिमम बॅलन्स वाढवून 50 हजार केला होता, पण रोषानंतर निर्णय मागे घेतला. HDFC बँकेने कोणतेही बदल केले नाहीत, AMB प्रोफाइलनुसार बदलतो. ग्राहकांनी पॅनिक होऊ नये.

advertisement
ICICI बँकेनं मिनिमम बॅलन्स 10 हजार रुपयांवरुन 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र रोषानंतर बँकेनं हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर HDFC बँकेनं देखील आपल्या मिनिमम बॅलन्समध्ये वाढ केल्याची बातमी आली होती. 10 हजार ऐवजी 25 हजार ठेवावे लागणार असं सांगितलं जात होतं. मात्र नेमकं काय खरं काय खोटं असा संभ्रम अकाउंट होल्डरला झाला आहे.
News18
News18
advertisement

HDFC बँकेनं मिनिमम बॅलन्सवरुन स्पष्ट उत्तर दिलं. कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. बँकेच्या म्हणण्यानुसार प्रोफाइलनुसार आणि ग्राहकांनुसार ही रक्कम बदलण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्यासाठी AMB वेगवेगळं असतं. मात्र आधीच्या नियमात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहकांनी पॅनिक होऊ नये अशा सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाईन पेमेंट होणार नाही? काय आहे कारण

advertisement

बँकेने म्हटले आहे की नियमित बचत खात्याचा AMB 10,000 आणि बचत कमाल खात्याचा AMB 25000 रुपये आहे. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जात होता की HDFC बँकेने किमान शिल्लक नियमांमध्येही बदल केले आहेत. त्यानंतर बँकेने हे स्पष्टीकरण जारी केले आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ICICI बँकेने गेल्या आठवड्यात नवीन बचत खात्यांसाठी MAB वाढवले होते. महानगर आणि शहरी शाखांमध्ये ते 50,000 रुपये, निम शहरी शाखांमध्ये 25,000 आणि ग्रामीण शाखांमध्ये 10,000 रुपये होते.

advertisement

ICICI नंतर HDFC बँकेचा मोठा निर्णय! सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावं लागेल एवढं मिनिमम बॅलेन्स

ग्राहकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर बँकेने नियम बदलले. आता ते महानगर आणि शहरी शाखांमध्ये 15,000 निम शहरी भागात 7500 रुपये आणि ग्रामीण शाखांमध्ये 2500 रुपये करण्यात आली आहे. ICICI बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खात्यांसाठी नवीन MAB लागू केले होते. ग्राहकांच्या अभिप्रायानंतर, त्यांच्या अपेक्षेनुसार हे बदलण्यात आले आहेत."

advertisement

किमान शिल्लक रकमेबाबत आरबीआयचा नियम

किमान शिल्लक ही महिन्याच्या शेवटी असलेल्या शिल्लक रकमेच्या साध्या सरासरीवर आधारित असते. जेव्हा खातेधारक निर्धारित किमान शिल्लक राखत नाही, तेव्हा बँक दंड आकारते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने स्पष्ट केले आहे की प्रत्येक बँक आपला एमएबी निश्चित करण्यास स्वतंत्र आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, "आरबीआयने किमान शिल्लक निश्चित करण्याचा अधिकार बँकेवर सोडला आहे. काही बँका ती 10,000 वर ठेवतात, काही 2000 रुपयांवर ठेवतात आणि काहींनी ग्राहकांना सूट दिली आहे. हे आरबीआयच्या नियामक क्षेत्रात येत नाही."

advertisement

मराठी बातम्या/मनी/
खरंच 25,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार का? HDFC बँकेने स्पष्टच सांगितलं काय खरं काय खोटं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल