TRENDING:

शेतकरी आता पिकांचंही काढू शकता इन्शुरन्स, पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोपी प्रोसेस

Last Updated:

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकावर विमा संरक्षण दिलं जातं.

advertisement
नवी दिल्ली : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वादळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. बऱ्याचदा त्यांना दुष्काळाचा सामनाही करावा लागतो. शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो. हे नुकसान कमी व्हावं, यासाठी केंद्र सरकारने पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी पिकाचा विमा उतरवू शकतात. असं केल्यास कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्या नुकसानाची भरपाई होण्यास मदत मिळते. प्रधानमंत्री फसल बिमा योजना काय आहे? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, या सर्व गोष्टींबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. या संदर्भातलं वृत्त 'जागरण'ने दिलं आहे.
पीएम फसल बिमा योजना
पीएम फसल बिमा योजना
advertisement

प्रधानमंत्री फसल बिमा योजना काय आहे?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकावर विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या 50 टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देतात. या योजनेत रब्बी पिकांवर विमा संरक्षणाचा प्रीमियम 1.5 टक्के आहे. यातला शेतकऱ्याला फक्त 0.75 टक्के विमा प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित रक्कम सरकार सबसिडी म्हणून देते. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या विम्यामुळे आर्थिक मदत मिळते.

advertisement

IT कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून घेणारा तरुण; कशी साधली किमया? Video

आवश्यक कागदपत्रं

- अ‍ॅप्लीकेशन लेटर

- पेरणी प्रमाणपत्र

- शेतीच्या जमिनीचा नकाशा

- आधार कार्ड

- बँक पासबुक

- पासपोर्ट आकाराचा फोटो

पैशांची बचत होत नाही? खर्चाला आवर घालण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

अर्ज कसा करायचा?

advertisement

- तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेत किंवा कृषी कार्यालयात जावं लागेल.

- तिथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा अर्ज भरावा लागेल.

- फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं पीक, शेत, विम्याची रक्कम इत्यादी माहिती द्यावी लागेल.

- यानंतर शेतकऱ्यांना फॉर्मसह सर्व कागदपत्रांच्या फोटो कॉपीज जमा कराव्या लागतील.

- जेव्हा कृषी कार्यालय किंवा बँकेकडून अर्ज स्वीकारला जाईल, तेव्हा शेतकऱ्याला विम्याचा प्रीमियम भरावा लागेल.

advertisement

- विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला पीक विमा पॉलिसी मिळेल.

मराठी बातम्या/मनी/
शेतकरी आता पिकांचंही काढू शकता इन्शुरन्स, पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोपी प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल