TRENDING:

Mumbai-Alibaug : फेरीबोटची गरज नाही! मुंबईहून कारने फक्त दीड तासात अलिबाग गाठणे शक्य; जाणून घ्या कसे?

Last Updated:

Atal Setu Mumbai to Alibaug direct route : मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता मुंबईहून अलिबाग आता अत्यंत कमी वेळात पार करता येणार आहे. प्रवासाचा हा वेळ कसा कमी होणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : अनेक वर्षांवापासून स्वप्न असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्यानंतर सिडकोने आता या भागातील दळणवळ अधिक सक्षम करण्यावर भर दिलेली आहे. त्यानुसार आता मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या अटल सेतूला थेट विमानतळ,जेएनपीए आणि थेट अलिबागला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आता कारने अवघ्या दीड तासात अलिबाग गाठणे शक्य
आता कारने अवघ्या दीड तासात अलिबाग गाठणे शक्य
advertisement

अलिबागला जाणं आता झालं अधिक सोपं

या प्रकल्पाचा भाग म्हणून उलवे कोस्टल रोडचा विस्तार करुन तो मार्ग रेवज-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचाही प्रस्ताव पुढे आला असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-अलिबाग हा प्रवास केवळ दीड तासांत करता येणार आहे.

असा असेल नवा मार्ग

या मार्गाच्या विस्तारामुळे अटले सेतू ते द्रोणागिरीमार्गे करजां-रेवस पुलापर्यंत अखंड असा कोस्टल कॉरिडॉर उभा राहणार आहे. शिवाय नवी मुंबई, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकण कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल.

advertisement

सहा-लेन कोस्टल रोडमुळे प्रवाशांना दिलासा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा 7 कि.मी लांबीचा असा 6लेन उलवे कोस्टल रोड सध्या उभारला जात आहे आणि याच मार्गाचा पुढचा टप्पा म्हणून द्रोणागिरीमार्गे करंजा खाडी पुलापर्यंत विस्तार करण्याचा सिडकोचा मानस आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Alibaug : फेरीबोटची गरज नाही! मुंबईहून कारने फक्त दीड तासात अलिबाग गाठणे शक्य; जाणून घ्या कसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल