'या' मुळे केला जातोय बदल
वाहतूक विभागाने मुंबई महापालिकेला रेलिंग बसवण्याची सूचना दिल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पादचारी कुठल्याही ठिकाणावरून रस्ता ओलांडतात, त्यामुळे अपघातांची संख्या वाढली होती. विशेषतहा वृद्ध, महिला आणि अपंग व्यक्तींच्या सुरक्षेचा विचार करून हे काम राबवले जात आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल 414 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामध्ये फक्त रेलिंगच नव्हे, तर बाकडी आणि इतर स्ट्रीट फर्निचरचाही समावेश आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, रेलिंग बसवल्यानंतर नागरिक ठरावीक ठिकाणीच रस्ता ओलांडू शकतील त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल.
advertisement
शहरात वेगाने वाढणारे शहरीकरण आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज होती. त्यामुळे आता मुंबईत कुठेही बिनधास्त रस्ता ओलांडता येणार नाही. पादचारी रेलिंगमुळे नियंत्रित मार्गानेच चालतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
हा बदल अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकतो, कारण अनेक भागात नागरिकांना सवय होती रस्ता सोपा दिसला की लगेच ओलांडायचा. पण आता ही सवय बदलावी लागणार आहे. पादचारी सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी, सामान्य मुंबईकरांना सुरुवातीला या रेलिंगमुळे त्रास होऊ शकतो. मात्र अपघात टाळण्यासाठी आणि रस्त्यांवरील गोंधळ कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.
