नेमकं काय म्हणाले उपाध्ये?
'भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा पक्ष वाढीसाठी असलेला धुमधडाका पाहून 'मातोश्री' चे डोळे दिपले असणार आणि भुंकण्यासाठी भास्कररावांचा पट्टा काढला असणार ! तुम्ही भुंकत राहा, दुसरे प्रवक्ते थुंकत राहतील, तुमच्या असल्या शिव्याशापांमुळे आमचा पक्ष जिंकत राहील ! काय करणार? गटाराचं तोंड तर धरू शकत नाही !' असा जोरदार पलटवार केशव उपाध्ये यांनी केला आहे.
advertisement
भास्कर जाधव यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
'तुम्ही उद्धव ठाकरेंवर व्यक्तिगत टीका करता ते तुम्हाला चालतं का?, तुम्ही उद्धव साहेबांना घरकोंबडा म्हणता शेवटी वेस्ट इंडिजच्या मानसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं.
