एल्फिन्स्टन ब्रिज बंद पडल्याने वाहतूक टिळक ब्रिज (दादर) आणि करी रोड ब्रिजकडे वळवण्यात येईल. मात्र, दोन्ही मार्गांवरून आधीच अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रवासाचा वेळ देखील वाढणार आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवडी-वरळी कनेक्टरचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक किंवा एमटीएचएल) वरील सुमारे 15 टक्के वाहतुकीची सोय होणार आहे. तसेच त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट प्रवेश देखील मिळणार आहे,” अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिलीये.
advertisement
फेब्रुवारीच्या शेवटी ब्रिज पाडणार
दरम्यान, एल्फिन्स्टन ब्रिजच्या पुनर्बांधणीला 19 इमारती अडथळा असल्याने त्यासाठी विलंब झाला. वाहतूक विभाग ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल पाडण्याचे एमएमआरडीएची योजना आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएला एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आवाहन केले आहे. पुनर्बांधणी केलेला एल्फिन्स्टन आरओबी सेनापती बापट रोड ते डॉ. बीआर आंबेडकर रोडला जोडणारा डबल-डेकर फ्लायओव्हर असेल. तर दुसरी शाखा शिवडी येथील एमटीएचएल आणि वरळी येथील वांद्रे-वरळी सी लिंकला थेट कनेक्टिव्हिटी असेल.