तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे तिन्ही आरोपी आपल्या बांगलादेशातील नातेवाईकांशी आणि संपर्कातील लोकांशी संवाद साधण्यासाठी IMO या मोबाईल ॲपचा वापर करत होते. या ॲपच्या माध्यमातून ते इंटरनेट कॉलिंग करत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण जावे, असा त्यांचा उद्देश असावा, असा पोलिसांना संशय आहे.
हे तिघे भारतात नेमके कोणत्या हेतूने आले होते? त्यांना येथे कोणी आश्रय दिला होता का? आणि त्यांनी बनावट भारतीय कागदपत्रे बनवली आहेत का? या दिशेने पंतनगर पोलीस आता अधिक तपास करत आहेत. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी अशी बेकायदेशीर वस्ती करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता शोधमोहीम तीव्र केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 7:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरायचे भन्नाट ट्रिक
