आशियातील ही सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा मानली जात आहे. ही फेरी दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 8 वाजता मुंबईवरून प्रस्थान करेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. मुंबई परतीच्या प्रवासासाठी दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी 1 वाजता ही बोट विजयदुर्गहून प्रस्थान करणार असून, मुंबई येथे सायंकाळी 7 वाजता पोहोचेल.
advertisement
एक प्लेट डाळ-भात पडलं 98 हजाराला; जेवण ऑर्डर केलं पण तोंडचं पाणी पळालं, मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?
जल वाहतुकीला चालना देण्याच्या शासनाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई-कोकण मार्गावर प्रवासी रो-पॅक्स फेरी सेवा चालविण्यासाठी एमटूएम फेरीज यांना परवानगी दिली आहे. या प्रवासासाठी इकॉनॉमीसाठी 2,500 रु, प्रिमीयम इकॉनॉमी 4,000, दुचाकी वाहन, 1,000 रु, सायकल, 600 रु, चारचाकी 6,000 रुपये असे दर असतील.
या सेवेच्या 625 पैकी शनिवारी रात्री साडेआठपर्यंत 446 तिकिटांची विक्री झाली होती. तिकीट विक्री रात्री उशिरापर्यंत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी 450 हून अधिक प्रवासी प्रवास करणार असून, ही बोट सकाळी भाऊचा धक्का येथून सुटणार आहे.






