कधी पासून करता येणार प्रवास?
नवी मुंबई विमानतळावरुन याआधी 16 शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता मात्र 29 मार्चपासून या विमानतळावरुन प्रवाशांना देशांतर्गत तब्बल 46 शहरांपर्यंत पोहचता येणार आहे. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीसाठी उन्हाळी सुट्टीचे पहिले वेळापत्रक एनएमएआय कंपनीने जाहीर केले आहे.
'या' शहरांत होणार उड्डाण
advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीसाठी दररोज 9 उड्डाणे होतील तर गोवासाठी 7, बेंगळुर 6 तसेच कोती 5 या शहरांसाठी सर्वाधिक जास्त उड्डाणे होतील याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी, इंदूर शहरांसाठी दररोज हवाई सेवा मिळणार आहे.
तर आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ ,चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा(डाबोळीम),गोरखपूर, हिंडन, राजकोट(हिरा सर), हुबळी, जबलपूर, जम्मू,झारसुगुडा , कन्नूर, कोल्हापूर, मदुराईस,पटना,रायपूर,श्रीनगर,तिरुपती, तिरुवनंतपुरम तसेच विशाखापट्टणम या शहरांसाठी सुद्धा ही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
