1 जानेवारी 2026 पासून ज्यांच्या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नंबरप्लेट नसेल, त्यांच्यावर राज्यभरातील आरटीओ (RTO) आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहनांची 1 एप्रिल 2019 च्या आधी नोंदणी झालेली आहे, अशा वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊनही लाखो वाहन धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता सरकारचे 'वेट अँड वॉच' धोरण संपले आहे. ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतली नाही, त्यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात दंडाच्या दणक्याने होऊ शकते.
advertisement
जर तुम्ही अजूनही तुमच्या वाहनाला HSRP नंबरप्लेट लावली नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या. अन्यथा तुम्हाला दंडाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. जर पहिल्यांदाच तुम्हाला ट्रॅफिक हवालदरांनी पकडलं तर तुम्हाला 1,000 रूपये इतका दंड आकारला जाईल. जर तुम्ही नियमाचे उल्लंघन सुरूच ठेवले आणि दुसऱ्यांदा पकडलं तर, तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. शिवाय, तुमच्या गाडीला HSRP नंबरप्लेट नसेल तर मालकी हस्तांतरण, पासिंग किंवा फिटनेस प्रमाणपत्र सारखे RTO चे महत्त्वाचे कामं करता येणार नाहीत. HSRP नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला अनेक महत्त्वाचे काम करता येणार नाहीत.
HSRP नंबरप्लेट काढण्याची शेवटची तारीख जरीही निघून गेली असली तरीही तुम्ही घाबरू नका. मात्र, आळस केलात तर तो तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. transport.maharashtra.gov.in या महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या वाहनाचा तपशील भरून ऑनलाइन फी भरा आणि 'फिटमेंट'साठी अपॉइंटमेंट बुक करा. जर तुमच्याकडे अधिकृत अपॉइंटमेंटची पावती असेल, तर पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत. HSRP नंबरप्लेटचे अनेक फायदे आहेत. जसे की, जर तुमचं वाहन चोरीला गेलं तर त्याचा शोध घेणं सोप्प होईल. 'लेझर कोड'च्या मदतीने पोलिस तुमचं हरवलेलं वाहन तुम्हाला शोधून देतील.
