प्रवाशांची मोठी चिंता मिटली
आजवर ही गाडी काही कालावधीसाठीच चालवली जात होती आणि वेळोवेळी तिची मुदत वाढवली जात होती. मात्र जळगाव, धुळे आणि नंदुरबार या भागातील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. तसेच कायमस्वरूपी गाडीची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
तिकीट दराबाबत नवा निमय
advertisement
या निर्णयामुळे आता प्रवाशांना आर्थिक फायदाही होणार आहे. कारण गाडी नियमित झाल्यानंतर तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.या सर्वांमुळे नोकरी करणारे, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्ण यांना प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीचा होईल.
जाणून घ्या वेळापत्रक
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते भुसावळ दरम्यान प्रवास करणे अधिक सोपे होईल तसेच भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
