काँग्रेसच्या समर्थनार्थ असलेले मतदार जाणीवपूर्वक पद्धतीने मतदार यादीतून वगळले आहेत. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतांना जाणीवपूर्वक वगळलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीच्या नंबरवरून १४ मिनिटांत १२ डिलिटेशन फॉर्म भरण्यात आले होते, असा दावा केला आहे. तसेच हे सगळं व्यक्तिगत करण्यात आलं नाही, तर असं करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला, असंही राहुल गांधी म्हणाले.
advertisement
सूर्यकांत, नावाच्या व्यक्तीने अवघ्या १४ मिनिटांत १२ वोटर डिलीट केले. त्यांनी अवघ्या १४ मिनिटांत मतदार यादीतून नावं काढून घेण्यासाठी १२ डिलिटेशन अर्ज दाखल केले. यासाठी वेगवेगळ्या राज्यातील क्रमांक वापरून हे डिलिट करण्याचे अर्ज भरण्यात आले, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी ज्यांच्या नावाने हे अर्ज डिलिट करण्यात आले आणि ज्याचे डिलिट केले गेले, अशा दोन्ही मतदारांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना बोलायला लावलं. यावेळी त्यांनी आपण अशाप्रकारे कुणाचेही अर्ज बाद करण्यासंदर्भात अर्ज केला नव्हता. कुणीतरी अज्ञाताने आपल्या नंबरचा वापर करून अशाप्रकारे अर्ज डिलिशनचे अर्ज भरण्यात आले, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राहुल गांधींनी आणखी एक उदाहरण यावेळी सांगितलं. त्यात एका व्यक्तीच्या नावाने मतदाराचं नाव वगळण्यासाठी दोन अर्ज अवघ्या ३६ सेकंदांच्या अंतराने भरण्यात आले. विशेष म्हणजे हे अर्ज पहाटे ४ वाजता भरण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. “नागराज नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोन अर्ज फक्त ३६ सेकंदांमध्ये भरले गेले. हे फॉर्म भरून बघा किती वेळ लागतो. तुम्हाला स्वत:लाच याचं उत्तर कळेल. शिवाय या व्यक्तीने पहाटे ४ वाजता उठून हे अर्ज भरले आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.