काय आहे प्रकरण?
२४ सप्टेंबर २०२५ रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर प्रशासनाने ही कारवाई केली होती. या हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी त्यांना 'रासुका' अंतर्गत ताब्यात घेऊन जोधपूर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५० हून अधिक जण जखमी झाले होते.
advertisement
गृह मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांनी त्यांच्या ताब्यात राहण्याच्या कालावधीचा निम्म्याहून अधिक काळ पूर्ण केला आहे. गेल्या साडेपाच महिन्यांपासून म्हणजेच सुमारे १७० दिवसांपासून ते तुरुंगात होते. आता त्यांची लवकरच सुटका होणार आहे.
लडाखची मागणी काय?
सोनम वांगचुक आणि लडाखमधील नागरिक प्रामुख्याने दोन मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. सहाव्या अनुसूचींतर्गत (6th Schedule) लडाखला घटनात्मक संरक्षण मिळावे.
काय असतो राष्ट्रीय सुरक्षा कायदा?
हा एक असा कायदा आहे जो सरकारला 'देशाची सुरक्षा' किंवा 'सार्वजनिक सुव्यवस्था' धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीला विना खटला ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. या कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त १२ महिन्यांपर्यंत नजरकैदेत ठेवता येते.
