बाबा वेंगा आणि AI बद्दलची भविष्यवाणी काय आहे?
बाबा वेंगा यांनी अनेक दशकांपूर्वी जगाच्या अंतापर्यंतच्या अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. जरी त्यांनी थेट 'AI' हा शब्द वापरला नसला, तरी त्यांनी 'मानवावर राज्य करणाऱ्या यंत्रां'बद्दल आणि 'अनैसर्गिक शक्ती' बद्दल इशारा दिला होता. सध्याच्या टेक लेऑफच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या दोन प्रमुख भविष्यवाण्या चर्चेत आहेत. बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, एक काळ असा येईल जेव्हा मानवी बुद्धिमत्तेला यंत्रांकडून आव्हान दिले जाईल आणि अनेक क्षेत्रात माणसांची जागा 'अमानवी शक्ती' घेतील. त्यांनी 2025-26 या वर्षांना अत्यंत क्रांतिकारी आणि विद्ध्वंसक बदलांचे वर्ष म्हटले होते. सध्या 2026 मध्ये आपण पाहत असलेली एआयची प्रगती आणि त्यामुळे जाणारी नोकरीची भीती याच भविष्यवाणीशी जोडली जात आहे.
advertisement
लेऑफ आणि एआयचा संबंध
अनेक कंपन्यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे की, जे काम पूर्वी 10 लोक करत होते, ते आता एक 'एआय टूल' अधिक वेगाने करत आहे. यामुळेच कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे. बाबा वेंगा यांनी म्हटल्याप्रमाणे, निसर्गाच्या विरुद्ध जाऊन बनवलेली बुद्धिमत्ता मानवासाठी संकट ठरेल. एआयमुळे सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी धोका निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानावर नियंत्रण असणारे काही मोजके लोक अधिक श्रीमंत होतील, तर मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग बेरोजगार होईल, असा इशारा दिला जात आहे. बाबा वेंगा यांनी जगाला विनाशाकडे नेणाऱ्या युद्धांची भविष्यवाणी केली होती. आज 'एआय'चा वापर सायबर हल्ल्यांसाठी आणि शस्त्रास्त्रांसाठी होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एआयच्या अतिवापरामुळे मानवी संवाद कमी होईल आणि जग एका 'यांत्रिक' युगाकडे झुकेल, ही भीती आता सत्यात उतरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, 2026 पर्यंत एआय मानवी मेंदूच्या बरोबरीने काम करू लागेल, ज्यामुळे केवळ तांत्रिकच नव्हे, तर सामाजिक क्रांतीही घडून येईल.
भविष्यवाणीचे सत्य की निव्वळ अफवा?
बाबा वेंगा यांच्या 85% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, अनेक तर्कवादी म्हणतात की, त्यांच्या भविष्यवाण्या या अत्यंत धूसर असतात आणि लोक आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
