TRENDING:

Papaya Farming: ऊस शेतीचा नाद सोडला अन् लावलं पैशाचं पीक, आता 2 एकरात 10 लाखांचा नफा!

Last Updated:
Papaya farming: ऊस शेतीला फाटा देत सांगलीतील शेतकऱ्यानं 2 एकर शेतात पपईची शेती केली. यातून त्यांना 10 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
advertisement
1/7
ऊस शेतीचा नाद सोडला अन् लावलं पैशाचं पीक, आता 2 एकरात 10 लाखांचा नफा!
सध्याच्या काळात शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच फळबागांची शेती करत आहेत. सांगली जिल्हा द्राक्षे आणि डाळिंबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आता याच जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने पपईची शेती केलीये. बाजाराचं गणित समजून घेऊन केलेल्या या शेतीतून त्यांना लाखोंची कमाई होतेय.
advertisement
2/7
कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर गावचे प्रगतशील शेतकरी कृष्णात मांडवे यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली. योग्य व्यवस्थापन करत दोन एकरातून त्यांनी 100 हून अधिक टन विक्रमी उत्पादन घेतले. यातून त्यांना दहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
advertisement
3/7
मांडवे हे ऊस पिकाला फाटा देत आले, हळद यांसह भाजीपाला पिके घेतात. त्यांनी जुलै 2023मध्ये त्यांनी दोन एकर क्षेत्रात 15 नंबर वाणाच्या पपईची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतजमिनीची उभी आडवी नांगरट केली. त्यांनी शेणखत, कोंबडी खत, काही प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा माती आड करून घेतली.
advertisement
4/7
साडेचार फूट अंतरावर सरी सोडत 9 बाय 5 फूट अंतरावर पपईची लागवड केली. लागवडीनंतर त्यांनी ठिबक संचनाचा वापर केला. पपईवर कोणत्याही प्रकारचा रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी झाडांना आळवणी, खते, कीटकनाशक फवारण्या घेतल्या. रोगराई थेट झाडावर येऊ नये यासाठी त्यांनी स्टिकर सापळ्यांचा प्रयोग केला. लागवडीच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी बेसल डोसची मात्रा देत झाडांना मातीची भर दिली.
advertisement
5/7
आठव्या महिन्यात पहिल्या तोडीला त्यांना अगदी 4 रुपयेपासून 28 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. आजखेर मांडवे यांनी दोन एकर क्षेत्रात सुमारे 20 ते 22 तोडे केले आहेत. त्यातून तब्बल 100 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. पिकास जवळपास दोन ते अडीच लाख खर्च आला असून यातून त्यांना 10 लाखाचा निव्वळ नफा आजपर्यंत मिळाला आहे.
advertisement
6/7
मांडवे यांच्या पपई बागेला तब्बल अठरा महिन्यांचा कालावधी झाला आहे. योग्य नियोजनामुळे झाडांची स्थिती उत्तम आहे. यापुढे अजून किमान चार ते पाच महिने त्यांची बाग सुरू राहणार आहे. त्यामुळे उत्पादन दीडशे टनावर जाईल, असा त्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना आणखी तीन ते चार लाख रुपयांचा लाभ होणार आहे.
advertisement
7/7
"शेतकऱ्यांनी फळबाग पिकाकडे वळले पाहिजे. तसेच बाजारपेठेचा अंदाज घेत लागवड केल्यास नक्कीच समाधानकारक यश मिळेल" असे प्रगतशील शेतकरी कृष्णत मांडवे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Papaya Farming: ऊस शेतीचा नाद सोडला अन् लावलं पैशाचं पीक, आता 2 एकरात 10 लाखांचा नफा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल