Street food lovers पावसाळ्यात जरा आवरा, पाणीपुरीच ठरू शकते घातक!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळा येताच स्ट्रीट फूड लव्हर्स आवडीचे पदार्थ खाण्यासाठी बाजारात गर्दी करतात. मात्र या काळात जिभेला आवर घालणंच बरं, कारण उघड्यावरच्या अन्नपदार्थांमुळे टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू जडू शकतो. (शिखा श्रेया, प्रतिनिधी)
advertisement
1/5

रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात, पावसाळ्यात घरी बनवलेले अन्नपदार्थ खावे, कारण बाहेरच्या अन्नपदार्थांसोबत आजारपण येऊ शकतं.
advertisement
2/5
पावसाळ्यात सर्वात धोकादायक ठरते ती पाणीपुरी. कारण त्यात वापरलेलं पाणी कितपत स्वच्छ असेल याचा आपण काही अंदाज लावू शकत नाही. त्यातून टायफॉइड होण्याचा धोका असतो.
advertisement
3/5
रस्त्याच्या कडेला मिळणारे चायनीज पदार्थ आणि चाटही <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/avoid-this-type-of-food-before-sleeping-for-healthy-life-doctor-given-important-information-mnkj-mhkd-1223432.html">खाऊ नये</a>. कारण ते उकळताना वापरलेलं पाणी अस्वच्छ असू शकतं. तर, चाटमध्ये कच्च सलाड असल्यामुळे त्यात विषाणू असू शकतात.
advertisement
4/5
बाजारात खायच्या ज्या ज्या पदार्थांमध्ये कच्च अन्न असतं ते खाऊ नये. कारण त्यात बुरशी किंवा इतर विषाणू असू शकतात. ज्यामुळे पोट बिघडू शकतं. या ऋतूत शक्य तेवढी आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/how-to-stay-energetic-while-fasting-mhij-1223935.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Street food lovers पावसाळ्यात जरा आवरा, पाणीपुरीच ठरू शकते घातक!