TRENDING:

Monsoon Picnic Spots : आला पावसाळा, मग चला फिरायला! मुंबईजवळचे कधी न पाहिलेले 10 मस्त ठिकाणं

Last Updated:
पावसाळा ऋतू हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या रम्य वातावरणात निसर्गाच्या कुशीत आपणही पावसाचा आनंद घ्यायला जाव अशी बहुतेकांची इच्छा असते. तेव्हा मुंबई आणि ठाण्याजवळ असे काही पिकनिक 10 स्पॉट्स आहेत जेथे तुम्ही कुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत जाऊ शकता.
advertisement
1/11
आला पावसाळा, मग चला फिरायला! मुंबईजवळचे कधी न पाहिलेले 10 मस्त ठिकाणं
येऊर : पावसाळ्यात ठाण्यातील रम्य ठिकाण म्हंटल तर सर्वप्रथम येऊर हिल्स हे नाव येतं. पावसाळ्यात येऊरचं सौंदर्य आणखीच खुलतं. हिरवीगार झाडी, पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे, ओहोटे, वन्यप्राणी इत्यादींनी येथील वातावरण फारच आल्हाददायक होत. या दिवसात सायकलस्वार आणि जॉगर्सची नेहमी रेलचेल असते. तेव्हा एकदिवसीय पावसाळी सहलीसाठी येऊर हा एक चांगला स्पॉट आहे.
advertisement
2/11
अक्सा बीच : ठाण्यापासून 40 किमी अंतरावर असलेला अक्सा बीच सुद्धा एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. अक्सा बीच त्याच्या सौंदर्यासाठी तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी ओळखला जातो. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा आनंद घेऊ शकता.
advertisement
3/11
भिवपुरी : माथेरानच्या कुशीत असलेलं हे ठिकाण मुंबईवरून अगदी जवळ आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनपासून धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी तेथे रिक्षांची सुविधा असते. तसेच पर्यटकांसाठी हॉटेल्सची सुद्धा सुविधा आहेत. दरवर्षी अनेक पर्यटक येथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
advertisement
4/11
पांडवकडा : नवी मुंबईच्या खारघर परिसरात असणारा पांडवकडा हा धबधबा गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील पर्यटकांचे आकर्षण ठरतोय. जोरदार पाऊस पडत असल्यास या धबधब्यावर येण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली जाते. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.
advertisement
5/11
गाढेश्वर : पनवेल तालुक्यातील गाढेश्वर नदीकाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. या ठिकाणी येऊन पर्यटक मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतात. एक दिवसीय पिकनिक स्पॉट म्हणून गाढेश्वर हे ठिकाण पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
advertisement
6/11
भगीरथ : मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पावसाळ्यात पर्यटक याठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद लुटतात.
advertisement
7/11
कोंडेश्वर धबधबा : बदलापूर येथून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असणारा कोंडेश्वर धबधबा पावसाळ्यात पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली इथे शेअर रिक्षा उपलब्ध असतात तसेच तुम्ही प्रायव्हेट गाडी करून सुद्धा येथे जाऊ शकता.
advertisement
8/11
कर्जत फार्म हाऊस : पावसाळ्यात तुम्ही कर्जत येथील फार्म हाऊसला सुद्धा भेट देऊ शकता. कर्जत येथे अनेक फार्महाउस असून ते निसर्गाच्या सानिध्यात आहेत. याठिकाणी स्वतंत्र स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा आनंद लुटू शकता. अनेक फार्म हाऊसमध्ये त्तम जेवणाची आणि राहण्याची सोया असते. विकऐंडला या फार्म हाऊसवर जातात.
advertisement
9/11
वज्रेश्वरी : भिवंडी येथील वज्रेश्वरी हे सुद्धा पावसाळ्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. वज्रेश्वरीला गरम पाण्याची कुंड असल्याने याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वज्रेश्वरी येथे अनेक धबधबे सुद्धा असून तुम्ही येथे येऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
advertisement
10/11
संजय गांधी नॅशनल पार्क : बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क हे पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पावसाळयात नॅशनल पार्कमध्ये तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी येथे फिरू शकता. या ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच खुलते. या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रकारचे वृक्ष आहेत.
advertisement
11/11
न्यूज १८ मराठीचं आव्हान : पावसाळ्यात पिकनिकला जात असताना आनंद घेण्यासोबतच स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धबधबा, नदी आणि समुद्र किनारे येथे गेल्यावर तेथील प्रशासनाने दिलेले नियम पाळा. पाण्याच्या ठिकाणी किंवा इतर धोकादायक जागेवर नको ते धाडस करुन रिस्क घेवू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Monsoon Picnic Spots : आला पावसाळा, मग चला फिरायला! मुंबईजवळचे कधी न पाहिलेले 10 मस्त ठिकाणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल