आता यायला लागतंय! चहा प्या, कप खा; जालन्याच्या तरुणाची भन्नाट आयडिया
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Tea Business: जालन्यातील एका युवकाने तर चहाच्या प्लास्टिक कपला भन्नाट पर्याय शोधला आहे. चहा घेतल्यानंतर कप फेकून न देता तो खाता येतो.
advertisement
1/7

आपल्याकडे चहा प्रेमींची कमी नाही. ‘चहाला वेळ नसते, परंतु वेळेला चहा हवाच’ असं अनेक चहाप्रेमींचं म्हणणं असतं. लोकप्रिय पेय असणाऱ्या चहामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. त्यामुळेच गुळाचा चहा, अमृततुल्य चहा, गवती चहा असे चहाचे प्रकार अधिक लोकप्रिय ठरत आहेत.
advertisement
2/7
जालन्यातील एका युवकाने तर चहाच्या प्लास्टिक कपला भन्नाट पर्याय शोधला आहे. चहा घेतल्यानंतर कप फेकून न देता तो खाता येईल अशा पद्धतीचे चहाचे कप उपलब्ध केले आहेत. यामुळे पर्यावरणातील प्लास्टिक कमी होण्यास देखील मदत होणार आहे. ‘चहा प्या अन् कप खा’ हा उपक्रम नेमका काय आहे? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
जालना शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या रियान कादरी या विद्यार्थ्याने शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या समोर ‘सिट अँड बाईट’ नावाने चहाचं दुकान सुरू केलं आहे. इथं चहाबरोबर दिला जाणारा कप हा गहू, रागी आणि मैदा यापासून तयार केलेला आहे. चहा घेतल्यानंतर हा कप आपल्याला खाता देखील येतो.
advertisement
4/7
गहू, रागी आणि मैद्यापासून बनवलेला हा चहाचा कप खाण्यासाठी असून कपात अर्धा तासापर्यंत चहा राहू शकतो. 20 रुपयाला एक अशी या चहा आणि कपची किंमत आहे. इलायची, व्हॅनिला आणि चॉकलेट अशा तीन फ्लेवरमध्ये हा कप उपलब्ध आहे.
advertisement
5/7
शिक्षणाबरोबर आपला काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने मी आणि माझ्या मित्राने हा व्यवसाय सुरू केला. बंगळूरमध्ये आम्ही या पद्धतीचे स्टॉल बरेच पाहिले. त्याच धर्तीवर जालन्यात देखील अशा पद्धतीचा चहा मिळावा अशी कल्पना आम्हाला सुचल्याचं तो सांगतो.
advertisement
6/7
या चहाच्या दुकानात काचेच्या ग्लासमध्ये देखील चहा उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगाला जालनाकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पद्धतीच्या कप आणि चहामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यास देखील मदत होणार आहे, असंही रियान सांगतो.
advertisement
7/7
प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेतल्यानंतर तो फेकून दिला जातो. फेकलेला प्लास्टिक कप डिस्पोज व्हायला किमान 20 वर्षे लागतात. त्याचबरोबर अशा कपात चहा घेतल्याने कॅन्सरचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. परंतु या पद्धतीच्या कपामध्ये चहा घेतल्यानंतर कॅन्सरचा धोका तर टाळता येईलच, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाला देखील मदत होईल, असं रियान कादरी याने सांगितलं.