TRENDING:

Ladki Bahin Yojna: E-KYC करायला गेलात, पण OTP आला नाही? तुमचं अकाउंट बंद तर झालं नाही?

Last Updated:
Maharashtra: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहेन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. सरकारी आदेशात म्हटले आहे की ई-केवायसीशिवाय मासिक मदत बंद केली जाईल.
advertisement
1/7
Ladki Bahin Yojna: E-KYC करायला गेलात, पण OTP आला नाही? नेमकं कारण काय?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहेन योजने'च्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. गुरुवारी याबाबतचा सरकारी आदेश जारी करण्यात आला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
advertisement
2/7
गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकार पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकत आहे. आतापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 14 हप्ते जमा झाले आहेत.
advertisement
3/7
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे समोर आले आहे. अनेक पुरुषांनीही आपण महिला असल्याचे दाखवत फॉर्म भरुन पैसे उचलले आहे. यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे. आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळेच आता केवायसी करणं गरजेचं केलं आहे.
advertisement
4/7
यामध्ये पुढील दोन महिन्यांचा कालावधी महिलांना दिला आहे. या कालावधीत केवायसी करणं गरजेचं आहे. केवायसी केलं नाही तर महिलांचा हप्ता बंद होणार आहे. मात्र अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी ओटीपीच येत नाहीये.
advertisement
5/7
केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक जणींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आधार क्रमांक टाकल्यानंतरही आवश्यक ओटीपी येत नाहीये. यामुळे लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाहीये. ही एक तांत्रिक समस्या आहे.
advertisement
6/7
केवायसी प्रक्रिया करण्यासाठी महिलांना स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. ज्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरन करावे लागते. दोन्ही प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. हा ओटीपी टाकल्यानंतरच केवासयी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र ओटीपीच येत नसल्याने अनेक महिला या त्रस्त झाल्या आहेत.
advertisement
7/7
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. मात्र यामध्येही तांत्रिक समस्या येत आहे. हे पाहता सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojna: E-KYC करायला गेलात, पण OTP आला नाही? तुमचं अकाउंट बंद तर झालं नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल