आजचं हवामान: राज्यात पुन्हा आस्मानी संकट, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती? 24 तासांचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून पुन्हा अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यात उष्णतेचा पारा सतत वाढत असून तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहते आहे. आज 11 एप्रिल रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
उन्हाच्या होरपळीत आता पुन्हा एकदा वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. गुरुवारी मालेगाव इथे सर्वाधिक 43 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. आज पुण्यातील कमाल तापमान 39 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
कोल्हापूरातील वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. लोक उकाड्याने हैराण आहेत. येथील कमाल तापमान 37 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे. येथील कमाल तापमान 40 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच आज निरभ्र वातावरणाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात उकाडा वाढत असून दुपारनंतर ढगाळ वातावरणाने गारवा निर्माण होईल.
advertisement
6/7
सातारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अशांच्या घरात गेला आहे. आज कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 असेल इतके राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आज ही प्रणाली निवळून जाणार आहे. पश्चिम-मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालींमुळे विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: राज्यात पुन्हा आस्मानी संकट, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती? 24 तासांचा हवामान अंदाज