TRENDING:

महादेवाचा कडक उपवास केला तरी अपूर्ण राहतील इच्छा, जर महाशिवरात्रीला खाल्लं नाही 'हे' फळ; का आहे महत्त्वाचं?

Last Updated:
महाशिवरात्रीचा सण म्हटला की उपवास, रुद्राभिषेक, बेलपत्र आणि हमखास बाजारात दिसणारे फळ म्हणजे 'कवठ'. भगवान शंकराच्या पूजेत कवठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
1/7
उपवास केला तरी अपूर्ण राहतील इच्छा, जर महाशिवरात्रीला खाल्लं नाही 'हे' फळ!
महाशिवरात्रीचा सण म्हटला की उपवास, रुद्राभिषेक, बेलपत्र आणि हमखास बाजारात दिसणारे फळ म्हणजे 'कवठ'. भगवान शंकराच्या पूजेत कवठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून ते आवर्जून खाल्ले जाते.
advertisement
2/7
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की याच दिवशी कवठ का खाल्ले जाते? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून एक शास्त्रशुद्ध आरोग्यदायी दृष्टिकोन देखील दडलेला आहे.
advertisement
3/7
पौराणिक मान्यतेनुसार, महादेवाला वनातील कंदमुळे आणि फळे अत्यंत प्रिय आहेत. कवठ हे शंकराच्या आवडत्या फळांपैकी एक मानले जाते. शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाच्या बियांमध्ये 'अमृत' उतरते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे.
advertisement
4/7
तसेच, महाशिवरात्रीचा काळ हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. या काळात थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. आयुर्वेदानुसार, या काळात शरीरातील उष्णता वाढू लागते आणि पित्तदोष निर्माण होऊ शकतो. कवठ हे प्रकृतीने थंड आणि पित्तशामक असल्याने, बदलत्या ऋतूत शरीराचे संतुलन राखण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे फळ खाण्याची परंपरा सुरू झाली.
advertisement
5/7
महादेवाचा प्रिय नैवेद्य: कवठ हे फळ बाहेरून अत्यंत कडक पण आतून मऊ आणि गोड असते. हे मानवी स्वभावाचे प्रतीक मानले जाते बाहेरून शिस्तबद्ध आणि आतून भक्तीने ओतप्रोत. महादेवाला हे फळ अर्पण केल्याने आपली भक्ती स्थिर होते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
6/7
पचनसंस्था सुधारते: कवठ हे पचनासाठी उत्तम मानले जाते. ज्यांना भूक न लागणे किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे फळ औषधासारखे काम करते. यातील पोषक घटक पोटातील कृमी नष्ट करण्यास मदत करतात.
advertisement
7/7
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शंकराची आराधना करून देवाची मनोभावे पुजा करतात. महादेवाला कवठ खूप आवडते, त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो. भक्तांनाही कवठ प्रसाद म्हणून दिली जाते. कवठाशिवाय महाशिवरात्री सण पूर्ण होतच नाही अशी मान्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
महादेवाचा कडक उपवास केला तरी अपूर्ण राहतील इच्छा, जर महाशिवरात्रीला खाल्लं नाही 'हे' फळ; का आहे महत्त्वाचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल