T20 World Cup : ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा भूकंप, वर्ल्डकपमधून बाहेर पडताच खेळाडूंच काही खरं नाही, बोर्ड कठोर निर्णय घेणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियाला आता वर्ल्ड कपमधला शेवटचा सामना शुक्रवारी ओमान विरूद्ध खेळायचा आहे. हा सामना औपचारीक असणार आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले आहे. या सर्वातला सर्वात मोठा उलटफेर हा ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधून बाहेर झाल्याचा ठरला आहे.
advertisement
2/7
वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये पहिल्यांदा झिम्बाबेने मोठा उलटफेर कर ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं होतं.
advertisement
3/7
त्यानंतर ग्रुप स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 8 विकेट राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आयरलँड आण झिम्बाबेच्या निकालावर अवलंबून रहावे लागले होते.पण हा सामनाच पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमध्ये बाहेर झाली होती.
advertisement
4/7
त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड खेळाडू मायदेशात परतल्यानंतर त्यांची चौकशी करणार आहेत, असे निवड समितीचे अध्यध टोनी डोडेमाईड यांनी सांगितले आहे.
advertisement
5/7
वर्ल्ड कपमध्ये ज्याप्रमाणे आम्ही कामगिरी केली ती खूपच निराशाजनक होती.पण आता आमच्यासाठी ओमान विरुद्ध चांगली कामगिरी करणे हे महत्वाचे आहे. या सामन्यानंतर ज्यावेळेस आमची टीम मायदेशात येतील तेव्हा त्यांच्या कामगिरीवर आम्ही विश्लेषण करू असे टोनी डोडेमाईडने सांगितले.
advertisement
6/7
ऑस्ट्रेलियाला आता वर्ल्ड कपमधला शेवटचा सामना शुक्रवारी ओमान विरूद्ध खेळायचा आहे. हा सामना औपचारीक असणार आहे. दरम्यान 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया पहिल्या राऊंडला बाहेर झाली होती.
advertisement
7/7
आम्हाला प्रत्येक वर्ल्ड कप जिंकायचा आहे.मग तो कुठे पण असो.पुढचा वर्ल्ड कप हा मायदेशात आहे.त्यामुळे आमचा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे,असे टोनी डोडेमाईडन म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा भूकंप, वर्ल्डकपमधून बाहेर पडताच खेळाडूंच काही खरं नाही, बोर्ड कठोर निर्णय घेणार