T20 WC : 'माझ्यासाठी सेफ नाहीये...', वर्ल्ड कपच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या हिंदू कॅप्टनला कशाची वाटतीये भीती?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bangladesh cricket t20 world cup : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या सहभागाबाबत सध्या मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशातच आता बांगलादेशच्या कॅप्टनने मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
1/7

आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 आधी मोठा राडा सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. बांगलादेशने भारतात क्रिकेटचे सामने खेळण्यास नकार दिला असताना आता लिटन दासने एका पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना क्रिकेट चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं आहे.
advertisement
2/7
बांग्लादेश जरी मुस्लीम देश असता तरी देखील बांग्लादेश क्रिकेट संघाचा कॅप्टन लिटन दास हा हिंदू खेळाडू आहे. अशातच लिटन दास भारतात खेळण्यासाठी हमी देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र...
advertisement
3/7
बांगलादेश क्रिकेट टीमचा कॅप्टन लिटन दास याने आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपबाबत विचारलेल्या प्रश्नावर अत्यंत धक्कादायक भूमिका घेतली आहे. या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणे आपल्यासाठी 'सुरक्षित नाही' असं म्हणत त्यानं अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
advertisement
4/7
"आम्ही हा वर्ल्ड कप खेळायला जाणार आहोत की नाही, हे तुम्ही खात्रीने सांगू शकता का? माझ्या बाजूने सांगायचे तर मी अनिश्चित आहे आणि सध्या संपूर्ण बांगलादेश याच संभ्रमात आहे." असं लिटन दास याने म्हटलं आहे.
advertisement
5/7
लिटनने सावध पवित्रा घेत पुन्हा तोच मुद्दा मांडला. पत्रकारांना उत्तर देताना तो म्हणाला की, या राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणं सुरक्षित नाही आणि माझ्या या उत्तराचा कृपया कोणीही राग मानू नये, असंही लिटन दास म्हटलं आहे.
advertisement
6/7
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (BCB) यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. लिटनने वापरलेला 'सुरक्षित नाही' हा शब्द त्याच्या मनातील भीती किंवा दबाव दर्शवत असल्याचे बोललं जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आज बांगलादेशला काहीही करून आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आयसीसीने 21 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत आज संपत आहे. त्यामुळे आयसीसी आज अखेरचा निर्णय घेईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 WC : 'माझ्यासाठी सेफ नाहीये...', वर्ल्ड कपच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या हिंदू कॅप्टनला कशाची वाटतीये भीती?