IND vs ENG : टीम इंडियाचं सर्वांत मोठं हत्यार निकामी, सेमी फायनलआधी टेन्शन वाढलं, पण कोचने एका वाक्यात विषय संपवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुसऱ्या सेमी फायनलची टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रचंड उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्डकपमध्ये उद्या 5 मार्च 2026 ला गुरुवारी भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात वानखेडेच्या मैदानावर दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
advertisement
2/8
या दुसऱ्या सेमी फायनलची टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रचंड उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
3/8
खरं तर टीम इंडियाने वेस्ट इंडीज विरूद्ध सामन्यात रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. टीम इंडियाच्या या विजयात संजू सॅमसनने 97 धावांची नाबाद खेळीकरून मोठी भूमिका बजावली होती.
advertisement
4/8
संजूने नुसता हा सामना जिंकवला नाही तर आपला हरवलेला फॉर्मही परत मिळवला.त्यामुळे टीम इंडियासाठी ही गुडन्यूज होती.
advertisement
5/8
पण एकीकडे संजू फॉर्ममध्ये परतला असताना दुसरीकडे अभिषेक शर्मा अजूनही आऊट ऑफ फॉर्म आहे. कारण त्याने मागच्या 6 सामन्यात 80 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 131.15 च्या आसपास आहे.
advertisement
6/8
अभिषेक शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म असल्याने त्याला सेमी फायनलमध्ये खेळवावे की त्याला बेंचवर बसवावं असा मोठा प्रश्न गौतम गंभीरला पडला होता. पण आता त्याच्या खेळण्यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
7/8
अभिषेक शर्माच्या खराब कामगिरीनंतरही भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने त्याची पाठराखण केली आहे. इंग्लंड विरूद्धचा सामना हा अभिषेकसाठी रिकामा कॅन्व्हास आहे,त्यामुळे त्याने चांगली कामगिरी करावी, असे मॉर्ने मॉर्केलने सांगितले आहे.
advertisement
8/8
संजू देखील मागचे काही आठवडे याच परिस्थितीतून जात होता. पण त्याने त्यावर मात केली.आता अभिषेककडे चांगली संधी आहे, त्याने मैदानात उतरून चांगली कामगिरी करावी,असे मॉर्ने मॉर्केल म्हणाले आहेत.त्यामुळे मॉर्केलने अभिषेक शर्माची पाठराखण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : टीम इंडियाचं सर्वांत मोठं हत्यार निकामी, सेमी फायनलआधी टेन्शन वाढलं, पण कोचने एका वाक्यात विषय संपवला