'No Handshake' वरून मोठा ड्रामा, INDIA vs PAKISTAN सामन्याच्या टॉस दरम्यान काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी पाकिस्तानी कॅप्टनशी हॅडशेक टाळला होता. सामना जिंकल्यानंतर भारताची तशीच भूमिका होती.
advertisement
1/6

टी20 वर्ल्डकप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेट सामन्याला सूरूवात झाली आहे. या सामन्याच्या टॉस दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये शेकहँड केला आहे की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
2/6
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात हॅन्डशेक होणार की नाही? हा मोठा मुद्दा होता.कारण मागच्या वेळेस आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तान खेळाडूंविरोधात 'नो हॅन्डशेक' धोरण पाळले होते.
advertisement
3/6
पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी पाकिस्तानी कॅप्टनशी हॅडशेक टाळला होता. सामना जिंकल्यानंतर भारताची तशीच भूमिका होती.
advertisement
4/6
यावरून आशिया कपमध्ये मोठा वाद पेटला होता.विशेष म्हणजे भारताने आशिया कप जिंकल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेणे टाळले होते. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन पळाले होते. आणि भारत रिकाम्या हाताने मायदेशात परतला होता.
advertisement
5/6
दरम्यान शनिवारी हॅन्डशेकवर बोलताना पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाने उद्या आपण काय ते बघू असे तो बोलला होता. तर सूर्यकुमार यादवने फक्त 24 तास थांबा, टॉसच्या वेळी सांगू, असे तो म्हणाला होता.
advertisement
6/6
या वादानंतर आता भारताने पुन्हा पाकिस्तानशी शेकहँड करणे टाळले आहे. खरं तर टॉस सलमान आगाने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या दरम्यान आपली टीम जाहीर करण्यापूर्वी खेळाडूंमध्य शेकहँड पार पडतो. पण सूर्या शेकहॅडसाठी गेलाच नाही आणि सलमान आगाने देखील उत्सुकता दाखवली नाही.त्यामुळे नो हॅन्डशेकचा वाद कायम राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'No Handshake' वरून मोठा ड्रामा, INDIA vs PAKISTAN सामन्याच्या टॉस दरम्यान काय घडलं?