IND vs PAK सामना, पुन्हा तोच मुहूर्त, शोएब अख्तर आयुष्यात विसरणार नाही ती महाशिवरात्र!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवार 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन्ही टीम कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांना भिडतील.
advertisement
1/8

पाकिस्तान सरकारने सुरूवातीला भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली, पण आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तानने यूटर्न घेत मॅच खेळणार असल्याचं जाहीर केलं.
advertisement
2/8
भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 8 वेळा आमने-सामने आले आहेत, यातल्या 7 वेळा टीम इंडियाचा विजय झाला तर फक्त एकदाच पाकिस्तानने सामना जिंकला आहे. तर वनडे वर्ल्ड कपमध्ये 8 वेळा दोन्ही टीम समोरासमोर आल्या, या सर्व 8 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.
advertisement
3/8
15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा सामना रंगणार आहे. याआधीही महाशिवरात्रीलाच भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपची लढत झाली होती. महाशिवरात्रीचा तो सामना पाकिस्तानी फास्ट बॉलर शोएब अख्तर कधीच विसरणार नाही.
advertisement
4/8
1 मार्च 2003 ला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर 273 रन केले.
advertisement
5/8
सेंच्युरियनच्या मैदानावर पाकिस्तानच्या आक्रमक बॉलिंगसमोर 274 रनचा पाठलाग करणं कठीण वाटत होतं, पण सचिन तेंडुलकर वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर या तिघांवर अक्षरश: तुटून पडला.
advertisement
6/8
सचिन तेंडुलकरने 75 बॉलमध्ये 130.66 च्या स्ट्राईक रेटने 98 रनची वादळी खेळी केली. पायातून गोळे येत असतानाही सचिनने झुंजार खेळी केली. सचिनचं शतक 2 रननी हुकलं असलं, तरी त्याच्या करिअरमधल्या सर्वोत्तम खेळीपैकी ही खेळी होती.
advertisement
7/8
सचिनने त्याच्या या खेळीमध्ये शोएब अख्तरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 रन ठोकल्या आणि क्रिकेट रसिकांच्या कायम लक्षात राहिल अशी सिक्सही मारली. शोएब अख्तरने त्याच्या 10 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन दिले.
advertisement
8/8
सचिनशिवाय युवराजने नाबाद 50, द्रविडने नाबाद 44 आणि कैफने 35 रनची खेळी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानवर 6 विकेटने विजय मिळवला. 1 मार्च 2003 ला महाशिवरात्रीला वर्ल्ड कपचा हा सामना झाला होता. आता 23 वर्षांनी 15 फेब्रुवारी 2026 ला पुन्हा एकदा महाशिवरात्रीलाच भारत-पाकिस्तान आमने-सामने असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामना, पुन्हा तोच मुहूर्त, शोएब अख्तर आयुष्यात विसरणार नाही ती महाशिवरात्र!