IND vs WI : ज्याला टीम बाहेर केलं, त्यानेच लाज वाचवली, टीम इंडियाचा शानदार विजय, सेमी फायनलला कुणाशी भिडणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना संजू सॅमसनने एकाबाजूने भारताचा डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलं.या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.
advertisement
1/6

टी20 वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव केला आहे. संजू सॅमसनच्या 50 बॉल 97 धावांची नाबाद खेळीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला. त्यामुळे या विजयासह टीम इंडिया आता सेमी फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/6
वेस्ट इंडिजने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती.कारण अभिषेक शर्माने 10 धावांची खेळी आहे.
advertisement
3/6
अभिषेक शर्मानंतर ईशान किशनही 10 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
4/6
संजूने एका बाजूने डाव सावरला असताना कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या हातून मोठी चूक झाली तो बाऊंड्री लाईनवर कॅच देऊन बसला होता.
advertisement
5/6
टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना संजू सॅमसनने एकाबाजूने भारताचा डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलं.या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.
advertisement
6/6
वेस्ट इंडिजच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर रॉस्टन चेसने सर्वाधिक 40, शाई होपने 32, रोवमन पोवेल 34 आणि जेसन होल्डर 37 धावांवर नाबाद राहिले होते. या धावांच्या बळावर वेस्ट इंडीजने 4 विकेट गमावून 195 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : ज्याला टीम बाहेर केलं, त्यानेच लाज वाचवली, टीम इंडियाचा शानदार विजय, सेमी फायनलला कुणाशी भिडणार?