पुणे जिल्हा परिषदेच्या 73 आणि 13 पंचायत समितीच्या 146 गणांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत कारेगाव गणातून माजी सरपंच निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून मनीषा पाचंगे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या अटीतटीच्या लढतीत मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा 329 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या पराभवामुळे निर्मला नवले आणि त्यांच्या समर्थकांमध्येही निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
निर्मला नवले काय म्हणाल्या?
कारेगाव गणातून झालेल्या पराभवानंतर माजी सरपंच निर्मला नवले यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करण्यात आला. तसेच, कार्यकर्त्यांकडून जास्त काम करून घेण्यासाठी दारू आणि ड्रग्सचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात त्यांच्या गावातील सुमारे 30 ते 40 तरुण ड्रग्सच्या आहारी गेलेत, असा आरोपही त्यांनी केला. हा पराभव अपेक्षित नव्हता, पण या निवडणुकीत पैशाचा पाण्यासारखा वापर करण्यात आला, ड्रग्सचा वापर करून तरुणांना कामासाठी रात्रभर जागं ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. माझा मतदार पुढील पाच वर्षांसाठी विकला गेला, ही भावना अत्यंत दुःखद असल्याचं त्यांनी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय अजित दादा पवार यांची आठवण काढत, सध्याचं राजकारण खूप खराब झालं असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.





