नावाचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊल
उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने शैक्षणिक, सामाजिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. मात्र, अनेकदा या नावाचा वापर वैयक्तिक किंवा व्यावसायिक स्वार्थासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
स्मारक आणि निधी संकलनावरही वॉच
केवळ संस्थाच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी अजितदादांचे पुतळे उभारणे किंवा स्मारके निर्माण करतानाही शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचे पालन करावे लागणार आहे. तसेच, त्यांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणाऱ्या संशयास्पद संस्थांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या जुन्या संस्थांना आपले नाव बदलून 'अजितदादा' यांचे नाव लावायचे आहे, त्यांनाही हाच नियम लागू असेल.
या निर्णयामुळे आता अजितदादांच्या नावाने चालणाऱ्या उपक्रमांमध्ये पारदर्शकता येणार असून, त्यांच्या नावाचा गैरफायदा घेणाऱ्यांना चाप बसणार आहे.
