दगडू शिवराम गायकवाड (वय ६२) आणि त्यांचे मित्र प्रशीक आंबोरे (वय ६०) अशी अपहरण झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दर्शनानंतर हे दोघेही आळंदी मंदिराच्या जवळ असलेल्या चाकण चौकात आले होते. यावेळी, मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले.
अपहरणकर्त्यांनी दोघा वारकऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवलं. त्यानंतर त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि धमकावण्यात आले. सुदैवाने, या दोन वारकऱ्यांपैकी एक वारकरी पळून जाण्यात यशस्वी झाला.
advertisement
Pune: डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन MBAच्या विद्यार्थिनीवर 3 वेळा फायरींग, पण बंदूक लॉक झाली अन्..
दरम्यान, अपहृत वारकरी दगडू गायकवाड यांचे पुत्र सदानंद गायकवाड (वय ३५, रा. रिसोड, जि. वाशीम) यांना खंडणीची मागणी करणाऱ्यांचा फोन आला. वडिलांचे अपहरण झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ आळंदी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. सदानंद यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सचिन सुरेश मोरे (वय ३०, रा. चऱ्होली खुर्द, खेड) आणि एका ४० वर्षीय महिलेला (रा. चऱ्होली खुर्द, खेड) अटक केली आहे.
तांत्रिक तपासाद्वारे सुटका
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक अमित गिरिगोसावी यांनी सांगितलं की, अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलचे लोकेशन आणि इतर तांत्रिक तपास करून संशयितांचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या दुसऱ्या वारकऱ्याचीही सुटका करण्यात आली आणि अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली.
