गोविंदगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त तसेच तुकाराम महाराजांचे वंशज दिलीप महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदगिरी महाराजांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रातील कोणताही शहाणा माणूस या वक्तव्याशी सहमत होणार नाही, असे दिलीप महाराज मोरे म्हणाले.
advertisement
देहू संस्थानाने खडसावलं
तर वैभव महाराज मोरे यांनी महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र संतांच्या विचारावर चाललेला आहे. तुकारामांचे अभंग हे पंचम वेद म्हणून अभ्यासले जातात. महाराजांच्या प्रत्येक अभंगावर मोठा अभ्यास झाला आहे. अणु व रेणू यावर महाराजांनी अभंग रचले आहेत. महाराजांची गाथा जो वाचेल त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होतील. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत महाराजांचे अभंग हे अभंगच राहतील, अशा शब्दात ज्ञानोबा तुकाबांचं महत्त्व देहू संस्थानाने गोविंद गिरी महाराज यांना सांगितले आहे.
ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न
संतपरंपरेत दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत, असे वादग्रस्त विधान करून अप्रत्यक्षपणे स्वामी गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न केला.
