TRENDING:

उन्हाचा कडाका आणखी वाढणार! कोकणात उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:

मार्च महिन्यात राज्यातील तापमानात बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात बरीच वाढ बघायला मिळाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता मार्च महिन्यात राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळणार असून उष्णतेचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. महिला दिनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement

महिला दिनाच्या दिवशी राज्यात सर्वत्र मुख्यतः निरभ्र आकाश राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात वाढ झाल्याने 8 मार्चसाठी मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात पुढील 24 तासांत आणखी वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement

एका लग्नाची अनोखी गोष्ट, अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 8 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात देखील वाढ होऊन ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement

View More

छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात सातत्याने चढ उतार सुरू आहे. 8 मार्चला तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

advertisement

उन्हाळ्याच्या सुरवातीला नाशिकमधील तापमानात घट दिसून येत होती. त्यानंतर दिवसेंदिवस त्यात काहीशी वाढ बघायला मिळाली. आता त्यात बहुतांश वाढ होऊन नाशिकमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत नाशिकमधील तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

advertisement

नागपूरमधील तापमानात देखील आता वाढ झालेली दिसून येत आहे. 8 मार्चला नागपूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तेथील तापमानात वाढ होऊन 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

मार्च महिन्यात राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. काही भागांत रात्रीच्या वेळी काहीशी थंडी सुद्धा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या/पुणे/
उन्हाचा कडाका आणखी वाढणार! कोकणात उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल