मुंबईत दादरच्या अमर हिंद मंडळाने वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती. यामध्ये ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर बोलताना गडकरी यांनी आपले आगामी प्लॅन सांगितले. यामध्ये अटल सेतूवरून बंगळुरुपर्यंत महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून अटल सेतू ते पुण्याचा रिंगरोड आणि पुणे ते बंगळुरु नव्या महामार्गाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आता बिनधास्त घ्या जुनी गाडी, फसवणुकीचं टेन्शनच नाही, RTO चा मोठा निर्णय
advertisement
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत सुरू होणार
मुंबई – गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या. हा महामार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. परंतु, येत्या जूनअखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी नवी डेडलाईन गडकरी यांनी दिलीये. तसेच येत्या 2 वर्षांत भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
टोलचे नवे धोरण
यावेळी बोलताना गडकरी यांनी 15 दिवसांत टोलचे नवे धोरण आणण्यात येणार आहे. या धोरणात वाहनचालकांची कोणतीही तक्रार नसेल. भविष्यात सॅटेलाईटच्या माध्यमातून टोलवसुली केली जाईल. त्यामुळे नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असेही गडकरींनी सांगितले.