प्रदूषणाचा विळखा: संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, शहरातील हवेतील पीएम २.५ (PM 2.5) या अतिसूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात वाहतुकीचा वाटा तब्बल ४६ टक्के आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०१२ ते २०१९ या काळात या उत्सर्जनात ९१ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. केंद्र सरकारने बीएस-६ मानके लागू केली असली, तरी पुण्यातील ७० टक्के वाहने अजूनही जुन्या बीएस-४ प्रकारातीलच आहेत.
advertisement
१५ वर्षांपेक्षा जुनी झालेली डिझेलवरील अवजड वाहने संख्येने कमी असली, तरी ती ओकत असलेला धूर सर्वाधिक विषारी आहे. तज्ज्ञांच्या मते, या वाहनांवर बंदी घातल्यास नायट्रोजन ऑक्साइड आणि घातक कणांच्या उत्सर्जनात ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. यामुळे शहराची हवेची गुणवत्ता (AQI) सुधारेल आणि श्वसनाच्या आजारांमुळे कमी होणारे पुणेकरांचे सरासरी आयुष्य पुन्हा वाढण्यास मदत होईल.
काय आहे प्रकरण?
पुणे शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना बंदी घातली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्याच्या रस्त्यांवर धावता येणार नाही.
