नेमकी घटना काय होती?
५ मे २०२४ रोजी हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, ठाणे) नावाचा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही अपघाती घटना वाटली असली तरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. किरकोळ वादातून वैभव जाधवने विनोद शार्दुल यांना कालव्यात ढकलून दिले होते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
प्रॅक्टीकलसाठी तळ्याजवळ गेले; आधी विद्यार्थी मग शास्त्रज्ञानं गमावला जीव, बारामतीत काय घडलं?
हरिद्वारमध्ये कसा सापडला आरोपी?
गुन्हा केल्यानंतर वैभव जाधव पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलीस गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ त्याचा माग काढत होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एका लॉजमध्ये नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. हडपसर पोलिसांचे एक पथक तातडीने हरिद्वारला रवाना झाले आणि गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेण्यात आले.
परिमंडळ सहाचे उपायुक्त सागर कवडे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली. आरोपीला घेऊन पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून, या हत्येमागील अधिक कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
