कसा असेल रेल्वे मार्ग?
पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास आणि अहिल्यानगर असा असणार आहे. यामध्ये एकूण 8 रेल्वे स्टेशन असणार आहेत. याचा चाकण, शिक्रापूर, रांजणगाव आणि अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा 75 किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येईल.
advertisement
मुंबई, पुणे आणि सोलापूरकरांसाठी खूशखबर, 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार, मुहूर्त कधी?
4 वर्षात काम पूर्ण होणार
रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुढील 4 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, हा रेल्वे मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. तसेच तळेगाव येथे न्यू तळेगाव आणि उरुळी कांचन येथे देखील नवीन स्टेशन उभारले जाणार आहे.
पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार
नव्या रेल्वे मार्गामुळे पुणे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंगरोड तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी कमी होईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.