तांत्रिक त्रुटींचा डोंगर
नगरसेवक सनी निम्हण यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्ष रस्ते आणि चेंबरच्या पातळीत मोठी तफावत आहे. बाणेर ते कृषी विद्यापीठ मार्गावर चेंबरचे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. वास्तुविशारद डॉ. विशाखा रगडे यांच्या मते, संरक्षण कठड्यांवरील 'क्रॅश' आणि जॉइंट्समधील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
advertisement
उद्घाटनाची घाई का?
काही ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट न करताच आणि तांत्रिक चुकांकडे कानाडोळा करून पुलाचे घाईघाईत उद्घाटन केल्यामुळे 'भोगवटा प्रमाणपत्र' (OC) नसताना ही घाई का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पीएमआरडीएने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्य अभियंत्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाच्या दीर्घकालीन टिकाऊपणावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात झालेली ही ढिलाई पुणेकरांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या त्रुटींची दुरुस्ती होते की पुन्हा एकदा 'जुगाड' करून वेळ मारून नेली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
