नेमका काय आहे वाद?
ही घटना १८ मार्च २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास येरवड्यातील यशवंतनगर परिसरात घडली. येथील रहिवासी कोमल शिरसागर (वय २९) यांच्या घराच्या दरवाजासमोर शेजारी राहणाऱ्या मुन्नी शेख आणि सिबा शेख यांच्या पाळीव मांजराने घाण केली होती. कोमल यांनी शेजाऱ्यांना सांगितलं की "तुमच्या मांजराने घाण केली आहे, ती साफ करा." मात्र, "ते मांजर आमचं नाहीच," असं उत्तर मिळाल्यानं वादाची ठिणगी पडली.
advertisement
धक्कदायक! फक्त एका शब्दाचा राग आला अन्...; पुण्यात दोन तरुणांचा वॉचमनवर जीवघेणा हल्ला, काय घडलं?
साध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली. आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना भररस्त्यात हाताने बेदम मारहाण केली. या भांडणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जखमी झालेल्या कोमल यांनी थेट येरवडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुन्नी आणि सिबा शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला आहे. "मांजराची घाण कोण साफ करणार?" या एका साध्या प्रश्नावरून दोन कुटुंब कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने येरवड्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
