पण तुम्हाला माहीत आहे का? ही एक छोटीशी सवय तुमच्या घरात कटकटी आणि अशांतीचं कारण ठरू शकते. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी नुकत्याच एका प्रवचनात याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नयेत? यामागे नेमकी काय श्रद्धा आणि तर्क आहे? जाणून घेऊया.
लिंबू-मिरची एकत्र ठेवल्याने 'क्लेश' वाढतात?
advertisement
देवकीनंदन ठाकूर यांच्या मते, लिंबू आणि मिरची या दोन्ही वस्तूंची प्रकृती अत्यंत 'तीव्र' असते. धार्मिक आणि पारंपारिक मान्यतेनुसार या दोन्ही गोष्टींचा संबंध ऊर्जेशी जोडला जातो. मिरची खाल्ल्यावर लगेच तिखटपणा जाणवतो, तर लिंबू प्यायल्यावर त्याचा आंबटपणा जिभेला झणझणून सोडतो.
जेव्हा आपण या दोन तीव्र प्रकृतीच्या गोष्टी एकाच डब्यात किंवा फ्रिजमध्ये एकाच जागेवर ठेवतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घरातील वातावरणावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. यामुळे घरात विनाकारण वादविवाद, तणाव आणि क्लेश निर्माण होण्याची शक्यता असते, असं त्यांनी सांगितलं.
आधुनिक जीवनशैली आणि जुन्या परंपरा
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सोयीला महत्त्व देतो, पण परंपरेला विसरत चाललो आहोत. देवकीनंदन ठाकूर यांनी फ्रिजच्या अतिवापराबाबतही भाष्य केलं आहे.
लिंबू आणि मिरची वेगळी ठेवण्याचा सल्ला हा केवळ एक नियम नसून, तो जीवनात शिस्त आणि संतुलन राखण्याचा एक संदेश आहे, असंही ते म्हणाले.
advertisementView this post on Instagram
