TRENDING:

Do You Know : जगातील सर्वात कठीण व्रत कोणता? कोणत्या धर्माचे आणि देशाचे लोक यामध्ये आघाडीवर?

Last Updated:

व्रत किंवा उपवास ही प्रत्येक धर्मात साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु काही व्रत खरोखरच अत्यंत कठीण आणि शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरतात. मग अशात प्रश्न असा उपस्थीत होतो की सगळ्यात कठीण व्रत कोणतं असतं किंवा कोण करतं?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगभरात प्रत्येक धर्मात व्रत आणि उपवासाची परंपरा आहे. हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम आणि यहूदी धर्म सर्वांमध्ये काही ना काही कालावधीसाठी अन्न-जलाचे संयम ठेवण्याची प्रथा आहे. सध्या नवरात्रीचा सण चालू आहे आणि भारतात अनेक लोक 9 दिवसासाठी उपवास ठेवतात. या वर्षी नवरात्री 10 दिवसांची आहे.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

व्रत किंवा उपवास ही प्रत्येक धर्मात साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु काही व्रत खरोखरच अत्यंत कठीण आणि शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरतात. मग अशात प्रश्न असा उपस्थीत होतो की सगळ्यात कठीण व्रत कोणतं असतं किंवा कोण करतं?

तर सर्वात कठीण व्रतापैकी एक आहे, सल्लेखना किंवा संथारा, जो जैन धर्माशी संबंधित आहे.

advertisement

सल्लेखना व्रत म्हणजे काय?

जैन धर्मात साधू आणि साध्वी अत्यंत साधं जीवन जगतात. त्यांची जीवनशैली अशी असते की ती अनेकांना अत्यंत कठीण वाटते:

ते जमीनवर झोपतात. नेहमी विना चप्पल चालतात.

जेवताना थाळी आणि भांड्याचा वापर करत नाहीत, फक्त हातांचा वापर करतात.

वाढलेले केस ताबडतोब खेचून उपटले जातात, त्यात थोडेसे रक्त ही येऊ शकते.

advertisement

सल्लेखना व्रतात साधू किंवा अनुयायी काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांपर्यंत अन्न आणि कधी कधी पाणीही सोडतात. काही ऐतिहासिक उदाहरणांमध्ये 68 दिवसांपासून ते 423 दिवसांपर्यंत केवळ पाणी किंवा अत्यल्प जल घेतलं गेलं असल्याचे प्रकरणं समोर आले आहेत.

हे व्रत का अत्यंत कठीण मानलं जातं?

हे व्रत स्वेच्छेने शरीराचा त्याग करण्याची प्रक्रिया मानली जाते.

advertisement

आध्यात्मिक दृष्टिकोनातून, शरीराने आपले कर्तव्य पूर्ण केल्यानंतर, मोक्षाच्या दिशेने पावले टाकली जातात.

या प्रक्रियेत अन्न आणि नंतर पाण्याचा त्याग हळूहळू केला जातो, ज्यामुळे शरीर कमजोर होतं.

हे फक्त शारीरिक उपवास नाही; यात दु:ख, वेदना, मोह-माया आणि मानसिक संघर्ष सहन करावे लागतात.

या व्रतात अत्यंत आत्मअनुशासन, विवेक आणि आध्यात्मिक ताकद आवश्यक असते.

advertisement

व्यक्तीला मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवावा लागतो.

संपूर्ण व्रतादरम्यान ध्यान, प्रार्थना आणि आत्म-चिंतन सुरू राहतं.

व्यक्तीला फक्त अन्न-पाणी नाही तर सर्व सांसारिक इच्छांपासून मुक्त होणे आवश्यक असते.

सल्लेखना व्यतिरिक्त इतर कठीण व्रत

जैन धर्मात सल्लेखना अंतिम आणि सर्वोच्च तपस्या मानली जाते.

काही योगी महासमाधी घेतात, जिथे ध्यानात राहून शरीराचा त्याग करतात.

तिबेटी बौद्ध धर्मातील तुकदम प्रथा: मृत्यूनंतरही योगी ध्यानमग्न राहतो आणि शरीर लगेच विघटित होत नाही.

हिंदू धर्मातील निर्जला एकादशी, जिथे अन्न आणि जल न घेतल्यावर व्रत ठेवले जाते.

ख्रिश्चन धर्मात ब्लॅक फास्ट, सूर्यास्तानंतर एक शाकाहारी जेवण मिळते.

यहूदी धर्मातील योम किप्पुर, 25 तास पूर्ण उपवास.

इस्लाममध्ये रमजान, विशेषत: उत्तरी देशांत 20–21 तास उपवास.

जगातील सर्वाधिक व्रत कोण धरतात?

सर्वाधिक धार्मिकता आणि व्रतांचे प्रमाण भारतामध्ये आढळते.

आस्था आणि धार्मिकतेनुसार इंडोनेशिया, मालदीव, सऊदी अरेबिया, पाकिस्तान आणि काही आफ्रिकन देशही धार्मिकतेसाठी प्रसिद्ध आहेत.

भारतात हिंदू, जैन आणि इतर धर्मांमध्ये साप्ताहिक, मासिक, वार्षिक आणि सणासुदीच्या काळात व्रत ठेवण्याची परंपरा आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Do You Know : जगातील सर्वात कठीण व्रत कोणता? कोणत्या धर्माचे आणि देशाचे लोक यामध्ये आघाडीवर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल