भगवान श्रीकृष्णांनी दिलेले गीतेचे ज्ञान आजही जगातील सर्वात समकालीन शास्त्र मानले जाते. महाभारत युद्धादरम्यान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले, जो द्रौपदीच्या 5 पतींपैकी एक होता. नात्याबद्दल बोलायचं झालं तर अर्जुनची आई आणि द्रौपदीची सासू श्रीकृष्णाची आत्या होती. अर्जुनने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी लग्न केलं, जी अभिमन्यूची आई होती. पण या नात्यांव्यतिरिक्त श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात एक नातंदेखील होतं. ते मैत्रीचे आणि मार्गदर्शकाचे होते.
advertisement
Mahabharat : उगाच नाही झाला कौरव-पांडवांचा जन्म, प्रत्येकाच्या जन्मामागे आहे रहस्यमयी कहाणी
द्रौपदीचं कर्ण आणि श्रीकृष्णावर प्रेम होतं अशा अनेक कथा आहेत. परंतु प्रसिद्ध लेखिका अमी गणत्रा यांनी त्यांच्या पुस्तकात महाभारतातील तथ्ये स्पष्ट करताना हे स्पष्ट केलं आहे की महाभारतात या दाव्यांना समर्थन देणारं काहीही नाही. त्या त्यांच्या पुस्तकात सांगतात की गीता प्रेस, केएमजी, दक्षिणा संशोधन किंवा बोरी सीई इत्यादींवर आधारित कोणत्याही ज्ञात संस्कृत हस्तलिखिते आणि भाषांतरांमध्ये हा दावा दर्शविणारा कोणताही श्लोक नाही. ही मिथक या महाकाव्याच्या आधारे केलेल्या कल्पनांवर आधारित आहे.
कारण महाभारतानुसार द्रौपदी श्रीकृष्णांना एक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून पाहत होती. तिने तिच्या सर्व चिंता आणि वेदना त्याच्यासोबत शेअर केल्या. अर्जुनानेही तेच केलं. द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यात कोणताही 'रोमँटिक' दृष्टिकोन नव्हता.
Mahabharat : एकमेकांचे व्याही होते कृष्ण आणि दुर्योधन, तरी दोघांचं कधीच जमलं का नाही?
कर्णाच्या बाबतीत द्रौपदीने त्याच्यात रस दाखवल्याचं एकही चिन्ह नाही. महाभारतात असं नमूद आहे की जेव्हा द्रौपदीचा स्वयंवर आयोजित केला गेला तेव्हा भारतातील विविध भागातील राजे इथं आले होते. या स्वयंवरात दुर्योधन, दुशासन आणि कर्ण देखील उपस्थित होते. परंतु द्रौपदीने अर्जुनाची निवड ब्राह्मणाच्या वेषात केली. याशिवाय फाशांचा खेळ, जयद्रथ आणि कीचकचा मोह यासारख्या घटनांवरून हे स्पष्ट होतं की द्रौपदी एक अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. परंतु तिने असं काहीही केले नाही ज्यामुळे तिला कर्णाबद्दल प्रेमाची भावना होती असं सूचित होईल.