महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं.
काय आहे तो शाप?
कथेनुसार महाभारत युद्ध संपलं तेव्हा माता कुंती कर्णाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रडत होती. हे दृश्य पाहून पांडव आश्चर्यचकित झाले. शत्रूच्या मृत्यूवर माता कुंती का रडत आहे, हे पांडवांनी तिला विचारलं. तेव्हा कर्ण आपला मोठा मुलगा असल्याचं तिनं आपल्या मुलांना सांगितलं.
advertisement
Ramayana : शूर्पणखाशिवाय आणखी एक स्त्री जी प्रभू श्रीरामांच्या प्रेमात पडली होती, लग्नही करायचं होतं
हे ऐकून युधिष्ठिरला राग आला आणि त्यानं माता कुंतीला शाप दिला. आजपासून संपूर्ण स्त्री जाती आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही, असं तो म्हणाला. तेव्हापासून हा शाप आजही महिलांना लागू आहे, असं म्हटलं जातं. महिलांच्या पोटात काही राहत नाही, असं म्हणतात.
कसा झाला होतो कर्णाचा जन्म?
महाभारत ग्रंथात सांगिल्यानुसार, एकदा दुर्वासा ऋषी कुंतीच्या सेवेने खूप आनंदित झाले. त्यांनी खुश होऊन कुंतीला एक मंत्र दिला. या मंत्राचा जप करून ती ज्या देवाची आराधना करेल, त्या देवाचा पुत्र तिला प्राप्त होईल, असं हे वरदान होतं. या मंत्राचं परीक्षण करण्याचा विचार कुंतीच्या मनात आला. तिने सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेवाकडून तिला कवचकुंडल असलेल्या पुत्राची प्राप्ती झाली.
Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला शक्तिशाली योग जुळणार, या राशींच्या भावा-बहिणींना धनलाभ, गुडन्यूज
पण लग्नाशिवाय जन्माला आलेलं हे मूल, लोक काय म्हणतील या भीतीनं कुंतीने मुलाला एका पेटीत ठेवून गंगा नदीत सोडलं. त्यानंतर तो हस्तिनापुरातील सारथी म्हणजे सुताला अधिरथला मिळाला. म्हणून त्याला सुतपुत्र म्हणतात. याशिवाय त्याचा सांभाळ करणारी आई राधाच्या नावावरून त्याला राधेय असंही म्हटलं जातं. दानाच्या या स्वभावामुळे त्याला दानवीर कर्ण असंही म्हणतात. जेव्हा कर्णाने देवराज इंद्रला स्वत:ची कवच-कुंडलं दान केली तेव्हा त्याला वैकर्तन असं नाव पडलं. वैकर्तन नावाचा अर्थ सूर्याच्या वंशात जन्म झालेली व्यक्ती असा होतो. अंगदेशचा राजा म्हणून त्याला अंगराज असंही म्हणतात.