TRENDING:

माघी गणपतीला 'तिलकुंद' गणेश चतुर्थी का म्हटले जाते? उद्या 'या' 6 गोष्टी केलात तर होईल जबरदस्त फायदा!

Last Updated:

उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात 'माघी गणेश जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाइतकेच महत्त्व माघ शुद्ध चतुर्थीला आहे, कारण या दिवशी भगवान गणेशाने 'महोत्कट विनायक' रूपात अवतार घेतला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maghi Ganpati 2026 : उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात 'माघी गणेश जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाइतकेच महत्त्व माघ शुद्ध चतुर्थीला आहे, कारण या दिवशी भगवान गणेशाने 'महोत्कट विनायक' रूपात अवतार घेतला होता. या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' या नावानेही ओळखले जाते. या सणाला हे विशिष्ट नाव का मिळाले आणि या दिवशी उपासना केल्याने कोणते लाभ होतात, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

याला 'तिलकुंद' चतुर्थी का म्हणतात?

या नावामागे दोन मुख्य धार्मिक आणि नैसर्गिक कारणे आहेत. माघ महिना हा थंडीचा काळ असतो. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला तिळाचे लाडू किंवा तिळमिश्रित गूळ अर्पण केला जातो. तसेच, भाविक तिळाच्या पाण्याने स्नान करतात, म्हणून याला 'तिल' चतुर्थी म्हणतात. माघ महिन्यात 'कुंदा'ची पांढरी शुभ्र फुले मोठ्या प्रमाणावर फुलतात. गणपतीला ही फुले अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी गणपतीची पूजा कुंदाच्या फुलांनी केली जाते, म्हणून याला 'कुंड' हे नाव जोडले गेले आहे. या दोन गोष्टींच्या संयोगामुळे याला 'तिलकुंड चतुर्थी' असे संबोधले जाते.

advertisement

माघी गणपतीला पूजा-पाठ केल्याने होणारे फायदे

1. वर्षभराच्या चतुर्थींचे पुण्य: असे मानले जाते की, माघी गणेश जयंतीला केलेले व्रत आणि उपासना ही वर्षभरातील सर्व 24 चतुर्थींच्या उपासनेइतके पुण्य देणारी ठरते.

2. संकटांचे निवारण: बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. या दिवशी 'गणेश अथर्वशीर्षा'ची आवर्तने केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात.

advertisement

3. शैक्षणिक यश आणि बुद्धी वृद्धी: विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते. सरस्वती आणि गणेश यांचा आशीर्वाद मिळाल्याने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते.

4. आरोग्य आणि दीर्घायुष्य: थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान केल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तिळाचे दान केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते.

advertisement

5. आर्थिक स्थिरता: ज्या लोकांच्या व्यवसायात सतत तोटा होत आहे किंवा ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यांनी या दिवशी गणपतीला 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

6. मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य: माघी गणपतीची कथा ऐकल्याने किंवा वाचन केल्याने मनातील अस्वस्थता दूर होते. कुटुंबात सुख-शांती येते आणि सदस्यांमधील प्रेम वाढते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल घरगुती जेवण, फक्त 30 रुपयात, पुण्यात हे आहे लोकेशन
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
माघी गणपतीला 'तिलकुंद' गणेश चतुर्थी का म्हटले जाते? उद्या 'या' 6 गोष्टी केलात तर होईल जबरदस्त फायदा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल